बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात रुग्णांची संख्या वाढीबरोबरच मृतांची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. राज्यात आज उच्चांकी 14888 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात 14 हजारांच्या पुढे रुग्ण आढळून येत आहेत. तर गेल्या 24 तासात 295 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7 लाख 18 हजार 711 इतकी झाली असून राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 18.94 टक्के इतके आहे.
14,888 new #COVID19 cases and 295 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases now stands at 7,18,711 including 5,22,427 recoveries and 1,72,873 active cases: State Health department pic.twitter.com/Lx857OW4Qv
— ANI (@ANI) August 26, 2020
एकीकडे कोरोना बाधित रुग्ण वाढत असताना कोरोनामुळे मृत्यु होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 295 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 3.21 टक्के इतके आहे. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. राज्यात गेल्या 24 तासात 7 हजार 637 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 5 लाख 22 हजार 427 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.69 टक्के इतके आहे.
सध्या राज्यामध्ये 1 लाख 72 हजार 873 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णांलयामध्ये उपचार सुरु आहेत. राज्यात 12 लाख 68 हजार 924 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 33 हजार 644 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आतापर्यंत राज्यात 37 लाख 94 हजार 027 प्रयोगशाळा चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापैकी 7 लाख 18 हजार 711 जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.