नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संबंध जगभरात थैमान घातले असून तो आता दिल्लीपर्यंत आल्याचे समजत आहे. इटलीमधून दिल्लीत आलेल्या एका संशयित व्हायरसने पीडित असलेला सापडला आहे. तर दुसरा संशयित तेलंगणामध्ये असून तो दुबईहून परत आला होता. यादरम्यान कर्नाटक सरकारने कोरोना व्हायरसमुळे आपातकालीन बैठक बोलावली आहे. दिल्लीत कोरोना व्हायरस पोहोचला असून नोएडामध्ये कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. नोएडाचे सीएमने म्हटले की, दोन शाळकरी मुलांचे सॅम्पल तपासासाठी पाठवले गेले आहे.
‘मी शाळेत बसलो आहे. शाळेवर परीक्षण केले जात आहे. नोएडामध्ये आतापर्यंत ४० लोकांची तपासणी झाली आहे. पाच लोकांचे सॅम्पल चाचणीसाठी पाठवले गेले आहे. २-३ तासात रिपोर्ट येणार आहे. अफवांकडे लक्ष देऊ नका. आमच्याकडे सगळ्या सुविधा आहे,’ असे त्यांनी सांगितले. सगळ्या जगात कोरोना व्हायरसने मृत्यू होत असलेल्यांची संख्या ३ हजारच्या वर जात असून चीनमध्ये आता अजून ४२ लोकांचा मृत्यू झाल्याची सूचना मिळत आहे. कोरोनाच्या भितीने ब्रिटिश एअरवेजने १६ ते २८ मार्च पर्यंत उड्डाण करणाऱ्या २१६ विमानांना रद्द केले आहे.
राजस्थान सरकारही अलर्ट
भारतात कोरोना व्हायरसने पीडित २ नवीन रुग्ण सापडले असून एका रुग्ण दिल्लीचा तर दुसरा तेलंगणामध्ये आहे. दिलीच रुग्ण हा इटलीहून यात्रा करून आला असून तेलंगणामधील रुग्ण दुबईहून यात्रा करून आला होता. हिताकडे २ नवीन प्रकरणांमध्ये कोरोना व्हायरसची पुष्टी झाल्यामुळे राजस्थान सरकारने राज्यात असलेल्या एका व्यक्तीला कोरोना व्हायरस असल्याची शंका आहे. कारण त्याचेही सॅम्पल पॉजिटीव्ह आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पर्यटन उद्योगालाही धोका
कोरोना व्हायरसने पूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण केले असून युरोपियन युनियनने कोरोमन व्हायरसच्या धोक्याची पातळी सामान्यपेक्षा जास्त वाढविली आहे. खरं तर युरोपमध्ये व्हायरस सतत पसरत असून कोरोना व्हायरसने मृत्यू झाल्यानंतर त्याची भीती जास्तच वाढली आहे. त्याचा परिणाम पर्यटनावर होत असल्याचा दिसून येत आहे. १५ ,मार्च ते १ एप्रिल दरम्यान परीक्षेनंतर आता आंतरराष्ट्रीय पर्यटनाने उच्चांक गाठला आहे. कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्यामुळे तिकीटे रद्द केली जात आहेत. ट्रॅव्हल एजन्टच्या मतानुसार ९० टक्के बुकिंग रद्द झाले आहेत.
दिल्ली-एनसीआरलाही नुकसान
थायलंड, सिंगापूर आणि मलेशियामधील क्रूझ बुकिंग पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. महामारीसारखा हा विषाणू दिल्ली-एनसीआरच्या पर्यटन उद्योगावरही भारी पडत असून या उद्योगाला आतापर्यंत १०० कोटींचे नुकसान झाले आहे.