नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात जेवढ्या वगोने कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, तितक्याच वेगाने कोरोनाने पीडित लोक बरेसुद्धा होत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आदेशानुसार देशात आतापर्यंत 29.70 लाख लोक कोरोनातून बरे झाले आहेत, जे कोरोनाच्या अॅक्टिव्ह प्रकरणांच्या 3.5 पट जास्त आहेत. मागील 24 तासांच्या आत 11 लाखांपेक्षा जास्त लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.
एका दिवसात सर्वात जास्त 68,584 लोक कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, 5 राज्यांमध्ये कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणे येत आहेत, देशातील 62 टक्के कोरोना प्रकरणे या राज्यांतील आहेत. ही राज्य तमिळनाडु, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र आहेत.
यासोबतच आरोग्य मंत्रालयाकडून त्या 5 राज्यांची नावे सुद्धा सांगण्यात आली, जेथे कोरोनामुळे सर्वात जास्त मृत्यू झाले. या 5 राज्यांमध्ये कोरोनाचे एकुण मृत्यू 70 टक्के आहेत. ही राज्य आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तमिळनाडु आणि महाराष्ट्र आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आंध्र प्रदेशात सक्रिय प्रकरणांच्या संख्येत 13.7 टक्के साप्ताहिक घट आली आहे. कर्नाटकमध्ये 16.1 टक्के घट तर महाराष्ट्रात 6.8 टक्के, तामिळनाडुत 23.9 टक्के आणि उत्तर प्रदेशात 17.1 टक्के घट आली आहे.
अर्थव्यवस्था सुधारण्याची एक क्रमबद्ध पद्धत
यासोबतच राजेश भूषण यांनी सांगितले की, देशात कोरोनाची नवी प्रकरणे सतत वाढत आहेत, याकडे देशातील लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. सरकारने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी एक क्रमबद्ध पद्धत अवलंबली आहे, ज्यामध्ये पर्याप्त कोरोना टेस्टींग, क्लिनिकल ट्रीटमेंट प्रोटोकॉलचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. जर लोक गटाने सायकल चालवत आहेत किंवा धावत आहेत, तर त्यांनी मास्क घालणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे.
प्रति 10 लाखांच्या लोकसंख्येत देशात कोरोनामुळे 49 मृत्यू
जगाच्या इतर देशांच्या तुलनेत देशात प्रति 10 लाख लोकांमध्ये कोरोनाची प्रकरणे खुप कमी आहेत. भारताच्या प्रति 10 लाख लोकसंख्येत कोरोनामुळे मृत्यू जगात सर्वात कमी आहेत. प्रति दहा लाखाच्या लोकसंख्येत देशात कोरोनामुळे 49 मृत्यू आहेत.
आयसीएमआरच्या संचालकांनी म्हटले की, देशात 70 जिल्ह्यांमध्ये दुसरे सीरो सर्वेक्षण सुरू झाले आहे. पुढील दोन आठवड्यात त्याचे परिणाम प्राप्त होण्यास सुरूवात होईल.
आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटले की, दिल्लीत सक्रिय प्रकरणे आणि मृत्यूंच्या संख्येत वाढ दिसून येत आहे, आम्ही दिल्ली सरकारसोबत सतत संपर्कात आहोत. आम्ही सरकारला काही निर्देश दिले आहेत, जर त्यांचे पालन केले गेले, तर प्रकरणे नियंत्रणात आणता येऊ शकतात.