बहुजननामा ऑनलाइन टीम –कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 14492 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर तब्बल 297 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 6 लाख 61 हजार 942 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 4 लाख 80 हजार 114 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 1 लाख 69 हजार 516 रूग्ण हे अॅक्टीव्ह आहेत.
14,492 new #COVID19 cases and 297 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases now stands at 6,61,942 including 4,80,114 recoveries and 1,69,516 active cases: State Health department pic.twitter.com/JeTefkG6u4
— ANI (@ANI) August 22, 2020
आज दिवसभरात 9241 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट हा 71.45 टक्के एवढा आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.27 टक्के एवढा आहे. राज्यात 12 लाख 11 हजार 608 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे तर 35 हजार 371 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलं आहे. 35 लाख 66 हजार 288 सॅम्पल घेण्यात आले होते त्यापैकी 6 लाख 61 हजार 942 जणांचा अहवाल आतापर्यंत पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा दर 18.84 टक्के आहे.