बहुजननामा ऑनलाइन टीम –
राज्यभरात कोरोना विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच राज्याच्या कानाकोपर्यातील नागरिकांची ने-आण करणार्या एसटी महामंडळातील
32 कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर 316 कर्मचारी विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
आतापर्यंत एसटी महामंडळाच्या 970 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 622 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये मुंबई व ठाणे विभागांतील सर्वाधिक कर्मचार्यांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत झालेल्या 32 कर्मचार्यांपैकी एसटीच्या मुंबईतील मुख्यालयातील चार कर्मचार्यांचा समावेश असून त्यानंतर सर्वाधिक कर्मचारी ठाणे विभागातील विविध आगारातील आहेत. कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत झाल्यास कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. मात्र अद्याप केवळ 6 कर्मचार्यांच्या वारसांनाच ही मदत मिळाली आहे. उर्वरित एसटी कर्मचार्यांना मदत केव्हा मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.