नवी दिल्ली : वृत्तसस्था – सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी थोडा अवधी शिल्लक राहिला असताना राज्यात आणि दिल्लीत मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या मुंबईत बैठका होत आहेत तर काँग्रेसच्या नवी दिल्लीत सोनिया गांधी यांच्या निवासास्थानी बैठक होत आहे. राज्यातील नव्या सरकार स्थापनेसाठी काँग्रेसने नवा फॉर्म्युला दिला आहे. काँग्रेसच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल आणि दोन उपमुख्यमंत्री असतील.
शिवेसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यासाठी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिल्ली येथे दाखल झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत सुरु असलेल्या बैठकीमध्ये राज्यात शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला देण्यावर चर्चा सुरु आहे. या बैठकिमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तसेच कॅबिनेटमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 14-14 मंत्री असतील असा फॉर्म्युला काँग्रेसकडून देण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी एनडीएमधून बाहेर पडावे अशी अटक काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला घातली होती. त्यानुसार आज शिवसेनेचे खासदार आणि केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना-भाजप युती संपुष्टात आल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यासाठीचा प्रस्ताव दिला आहे.
Visit : bahujannama.com