बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल झालेल्या गुप्त भेटीमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबल उडाली आहे. एकमेकांवर घणाघाती टीका करणारे 2 नेते अचानक गुप्तपणे भेटल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीत सामनातील मुलाखतीची चर्चा झाली असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. मात्र राऊत आणि फडणवीसांच्या भेटीनंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी निशाणा साधला आहे.
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 2 तास बैठक झाली. सांताक्रूझच्या ग्रँड हयातमध्ये ही बैठक झाली. या भेटीमुळं भविष्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले संजय निरुपम ?
संजय निरुपम म्हणाले, “शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बवण्याची मोठी भूक लागली आहे. ही भूक नेहमी नेत्याची राजकीय कारकीर्द उध्वस्त करते. ही दुर्भावना नाही तर वास्तविकता आहे” असंही निरुपम म्हणाले.
ऐसा लगता है शिवसेना के कंपाउंडर को हेडलाइन बनाने की भारी भूख लग गई है।
यही भूख अक्सर नेताओं को खा जाती है।
यह दुर्भावना नहीं, एक वास्तविकता है।#GrandHyatt— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) September 27, 2020
काय म्हणाले संजय राऊत
काल झालेल्या भेटीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ती भेट गुप्त नव्हती. शिवसेनेत गुप्त बैठका वगैरे होत नाहीत. मुलाखतीबाबत ती भेट होती. त्याचे वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. राजकारणात आम्ही वैयक्तिक शत्रुत्व मानत नाही” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. या भेटीबाबत उद्धव ठाकरे यांना कल्पना होती असा दावाही त्यांनी केला आहे.