नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्या ट्विटरवर #cancelallBlueTicksinIndia हा हॅशटॅग ट्रेंड करताना दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की, भारतात ट्विटरवरील ब्लू टीक म्हणजेच व्हेरीफाईडचं निळं निशाणं बंद करा. हा हॅशटॅग 30,700 वेळा ट्विट करण्यात आला आहे. एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी #TwitterHatesSCSTOBCMuslims हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. याचा अर्थ असा की, ट्विटर अनुसूचित जाती, जमाती, मागास वर्गीय आणि मुस्लिमांचा तिरस्कार करतं. सोमवारी ट्विटरवर #JaiBheemJaiMandalJaiBirsa टॉप ट्रेंडवर होता. याशिवाय गेल्या शुक्रवारी #CasteistTwitter, #JaiBhimTwitter आणि #SackManishMaheswari असे हॅशटॅघ ट्रेंड करताना दिसले. ज्या मनिष महेश्वरी यांचा हॅशटॅग बनवण्यात आला ते ट्विटर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.
हे सर्व हॅशटॅग वरिष्ठ पत्रकार, बहुजन कार्यकर्ता प्रो. दिलीप मंडल यांच्या नेतृत्वात ट्रेंड करण्यात येत आहेत. दिलीप मंडल दीर्घकाळापासून मागणी करत आहेत की, त्यांचं ट्विटर अकाऊंट व्हेरीफाय केलं जावं. त्यांनी आरोप केले की, ट्विटर जातीच्या पर्वाग्रहामुळे आणि मनुवादी मानसिकतेमुळे बहुजन समाज म्हणजेच दलित, आदिवासी, मागास वर्गीय आणि मुस्लिमांसोबत भेदभाव करत आहे. त्यांच्या या आरोपांचं मोठ्या प्रमाणात समर्थनही करण्यात आलं.
मुझे लग रहा था कि "सबको ब्लू टिक दो या सबका खत्म करो" के समतावादी विचार का वामपंथी, प्रगतिशील, क्रांतिकारी ब्लू टिक वाले जरूर समर्थन करेंगे.
हाय रे तुम्हारी प्रगतिशीलता. #cancelallBlueTicksinIndia
— Dilip Mandal (@Profdilipmandal) November 6, 2019
अशात शुक्रवारी ट्विटरने दलित कार्यकर्ता हंसराज मीणा आणि नंतर दिलीप मंडल यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं. यानंतर मात्र बहुजन कार्यकर्त्यांच्या ट्विट्सला ट्विटरवर पूर आला. याचा परिणाम असा झाला की, दिलीप मंडल यांचं अकाऊंट पुन्हा त्यांच्या हवाली करण्यात आलं आणि ते ब्लू टीकने व्हेरीफाय देखील करण्यात आलं.
हे अकाऊंट व्हेरीफाय केल्यानंतर आणखी एका वर्गाने या व्हेरीफेकिशनबद्दल विरोध दाखवला आणि असे म्हटले की अशा लोकांना प्रोत्साहन देऊ नका जे जातीयवाद वाढवतात. यानंतर मात्र ट्विटरवर दलित समर्थक आणि दलित विरोधी यांच्यात वॉर सुरू झालं. दोन्ही बाजूंनी वेगवेगळे हॅशटॅग ट्रेंड करताना दिसले. अशात बहुजन कार्यकर्ता आणि ट्विटर अधिकाऱ्यांमध्ये मुंबईत एक बैठकही पार पडली. परंतु या समस्येचं निराकारण काही झालं नाही. अद्याप हे वॉर सुरूच आहे.
बहुजन कार्यकर्त्यांना असे का वाटत आहे की, त्यांच्यासोबच भेदभाव करत आहे, दिलीप मंडल यांनी सांगितलं की, “ट्विटरकडे हॅशटॅग व्हेरीफाय करण्यासाठी कोणतीही नीती नाही. प्रत्येकाला हे माहित आहे की एकदा ट्विटर हँडलचे व्हेरीफिकेशन झाले की त्याची सत्यता आणि पोहोच अनेक पटीने वाढते.” हे आंदोलन सुरू झालं तेव्हा दिलीप मंडल यांचे 30 हजार फॉलोवर्स होते परंतु दोन दिवस आधी त्यांचं अकाऊंट व्हेरीफाय झाल्यानंतर मात्र ही संख्या 50 हजाराच्या पुढे गेली. मंडल सांगतात की त्यांचं अकाऊंट या गोष्टीचा पुरावा आहे की, ब्लू टीक आल्यानंतर फॉलोवर्स वाढतात.
वोटिंग में हिस्सा लेने वाले लगभग 11,000 दोस्तों में से 70% का मेरे लिए आदेश हुआ है कि मुझे ब्लू टिक यानी वेरिफिकेशन वापस करना है. मतदान जारी है. मतदान का जो भी फाइनल नतीजा निकलेगा, उसका पालन होगा. मेरी वाल पर आकर मतदान में हिस्सा लें. #बेशर्मजातिवादीट्विटर pic.twitter.com/4QAwmwSHu9
— Dilip Mandal (@Profdilipmandal) November 5, 2019
या आंदोलनातील लोकांचा आरोप आहे की, ट्विटर जाणून बुजून वंचित समाजातील लोकांचं अकाऊंट व्हेरीफाय करत नाही कारण त्यांच्या पोस्ट जास्त पोहोचू नयेत. म्हणून ट्विटर हेही सांगत नाही की, व्हेरीफाय करण्याचा आधार काय आहे. असेही आरोप करण्यात आले आहेत की, असे अनेक लोक आहेत ज्यांचे फॉलोवर्स कमी असूनही त्यांचं अकाऊंट व्हेरीफाय केलं जातं. परंतु वंचित समाजातील लोकांचे लाखो फॉलोवर्स असूनही त्यांचं अकाऊंट व्हेरीफाय केलं जात नाही. उदाहरण म्हणून फिल्म डायरेक्टर पी ए रंजीत यांचं नाव घेऊ शकतो. त्यांचे 8 लाख फॉलोवर्स असूनही अकाऊंट व्हेरीफाय नाही. अशीच स्थिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि भीम आर्मीचे नेते चंद्रशेकर आझाद यांची आहे.
या हॅशटॅगशी संबंधित एक कार्यकर्ता सय्यद मुहम्मद अर्शीने ट्विट केले की, “ट्विटरला आपल्या व्हेरीफिकेशन प्रणालीत सुधारणा करण्याची गरज आहे. नाहीतर, असे ट्रेंड रोजच सुरू राहतील.”
https://twitter.com/Justice_fikri/status/1191959411645911040
#बेशर्मजातिवादीट्विटर
Don't forget history what they did to us…~Be unite and educated~#cancelallBlueTicksinIndia pic.twitter.com/ZeOEXA8WHm
— vikaskataria111 (@katariavikas1) November 6, 2019
https://twitter.com/Ambedkar_World/status/1191984330924412929
या सर्व वादादरम्यान ट्विटरच्या प्रवक्त्याने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, “ट्विटरची ही प्रक्रिया पूर्णपणे नि:पक्षपाती आहे. यात धर्म जाती, समुदाय यांच्यात भेदभाव केला जात नाही. सध्या अकाऊंट व्हेरीफिकेशनची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.”
याला उत्तर देताना दिलीप मंडल म्हणाले, “व्हेरीफाय करण्याचा खेळ बंद व्हायला हवा. ट्विटरवर कोणालाच ब्लू टीक देऊ नका. सर्वांसाठी ट्विटर समान करा.” आतापर्यंत #cancelallBlueTicksinIndia या हॅशटॅगची संख्या 38.8 हजार झाली आहे.