कोची : बहुजननामा ऑनलाईन- भारताच्या पहिल्याच स्वयंनिर्मित विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत-२’ च्या कॅम्प्युटर यंत्रणेतील काही भाग बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यासंबंधी पोलीसांच्या विशेष तपास पथकाकडून तपास सुरु झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शिपयार्डकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोचिन शिपयार्ड लिमिटेडमध्ये उभारणी सुरू असलेल्या ‘आयएनएस विक्रांत-२’ या युद्धनौकेतील कॅम्प्युटरच्या यंत्रणेतील काही भाग नसल्याचे काही कर्मचाऱ्यांना आढळून आले. मात्र हे बेपत्ता झालेले हार्डवेअर युद्ध नौकेतील यंत्राचा भाग नसल्याने सुरक्षिततेबाबात कोणताही धोका नसेल. ही चोरी कधी झाली हे सुरक्षा अधिकाऱ्यांना ठाऊक नाही. या प्रकरणाची तक्रार एर्नाकुलम पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलीसांचे विशेष पथकाने तपास सुरु केला आहे. तरीही शिपयार्डच्या सुरक्षित भागातून चोरी झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी संरक्षण प्रवक्त्याशी संपर्क साधला असता, हे प्रकरण नौदलाच्या अधिकार कक्षेत येत नसल्याचे सांगत त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. कोचिन शिपयार्ड लिमिटेड येथे ही युद्धनौका तयार केली जात असून पोलिस आयुक्त तपासावर लक्ष ठेवून आहेत.
Visit : bahujannama.com