लातूर : बहुजननामा ऑनलाईन – जालन्यातील युवकांच्या मार्गदर्शनाखाली टेलिग्राम ग्रुप मध्ये चालू केलेल्या पद्मशाली समाज वधू वर परिचय ग्रुप मध्ये 3 हजार पेक्षा जास्त लोकांना जोडून समाज एकत्रित करणाऱ्या युवकांचे लातुरात कौतुक व जंगी सत्कार करण्यात आले. यावेळी लातूर जिल्हात मोठ्या प्रमाणात पदमशाली समाज एकत्रित होऊन लोकार्पण सोहळा संपन्न केला गेला.भारतातच नव्हे तर भारता बाहेर स्थळ मिळवले आहे.नौकरी साठी भारताबाहेर गेलेल्या युवक युवतींना स्थळ ह्या टेलिग्राम ग्रुप मधून मिळवले आहे त्या बद्दल अनेक जण खुश आहेत.
महाराष्ट्र मध्येच नव्हे तर अनेक राज्यात पाहुणे मंडळी आहे पण त्यांचा परिचय नसल्याने अनेकांना दुसऱ्या राज्यात मुलगी देने किंवा मुलगी दुसऱ्या राज्यातील करणे ह्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे म्हणून पाहुणे म्हंटल तर ओळख कुठून न कुठून निघत असते त्याच माध्यमातून अनेक जणांचे संसार जालना येथील आकाश गुंटूक यांनी पुढाकार घेऊन टेलिग्राम ग्रुप च्या माध्यमातून समाज जोडणी केली आहे त्यामुळे त्यांचे अनेक राज्यातून कौतुक होत आहे जर कोणी वधूवर विवाह संस्था मधून बोलत आहे किंवा अमूक अमूक संस्थे मधून पैसेच्या मागणी बाबत फोन आल्यास कुठल्याही प्रकारचे पैसे अदा करू नये असे ह्या सूचक केंद्र यांनी म्हंटले आहे ही सेवा यांनी निशुल्क ठेवली आहे. आपल्या बाबत फसवेगिरी किवा लबाडी झाल्यास गुप्र मध्ये कोणीही जवाबदार राहणार नाही. असे देखील ग्रुप च्या वतीने सांगण्यात आले आहे त्या मुळे समाज बांधवा साठी अधिक सोयीस्कर झाले आहे.
अखिल भारतीय पदमशाली वधू वर मिलन टेलीग्राम चा ग्रुप बनवलेला आहे त्यात महाराष्ट्र , विदर्भ , छत्तीसगढ़ , गुजरात , आंध्र तेलंगाना सगळे पद्माशाली समाज आपल्या मुलांनचा किंवा नातेवाईकांचा लग्ना योग्य आहे असा त्यांचा बायोडाटा ह्या ग्रुप ला लिंक द्वारे ऍड होऊन जोडू शकता आणि आपल्या मुलांन च भविष्य बनवू शकता.लोकार्पण सोहळ्यात आयोजक श्रीनिवास नक्का लातूर गंगाधरजी गोरखे नागनाथ रामदिनवार बाबुराव अडबलवार प्रशांत रब्बेवार सुरेश रब्बेवार ,राम पेन्टेवार ,मारोती अंचेवार ,शिवचंद्र मलफेदवार, सुमित्राताई गोरखे, प्रविण नक्का ,तर प्रमुख पाहुणे कविताताई गंड्डम ,नागनाथ गड्डम, नारायण इरबतनवार ,संग्राम निलपंत्रेवार ,नरसिंग चिलकेवार उपस्थित होते.