बहुजननामा ऑनलाईन : विधानसभा निवडणूक निकालानंतर आता राज्यात सत्ता वाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. बहुमतामुळे राज्यात पुन्हा महायुती सत्ता स्थापन करणार हे निश्चित झाले आहे. जागावाटपाच्या वेळी तडजोड केली परंतु सत्तेत सामान वाटा मिळावा अशी मागणी शिवसेनेने उचलून धरली होती. परंतु शिवसेना पुन्हा नरमाईची भूमिका घेताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री पदासह एकूण १६ मंत्रीपद देण्याची ऑफर भाजपने शिवसेनेला दिली होती. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री कोण व्हावा यासाठी शिवसेनेत दोन मतप्रवाह आहेत. मात्र आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री व्हावे अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे.
युवानेते आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. कारण आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री झाले तर भाजप आणि शिवसेनेत चांगला समन्वय साधला जाईल, असे मुख्यमंत्री यांचे मत आहे. मागील कार्यकाळात दोन्ही पक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्वयाची भूमिका पार पाडावी लागल्याने फडणवीस यांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. त्यामुळे आदित्य हे जर उपमुख्यमंत्री झाले तर युवा नेतृत्व समन्वयाची भूमिका योग्य पद्धतीने पार पाडेल, ज्यामुळे अनेक निर्णय घेणे सोपे होईल तसेच नियमित चर्चा देखील होईल, असे फडणवीस यांचे मत आहे .
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री पद हे आदित्य यांच्या आधी सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे देण्यात यावे, कारण अडीच वर्षांनंतर ते सोडताना फारसा गोंधळ उडणार नाही , असे शिवसेना पक्षातील एका गटाचे मत आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री पदासंदर्भात कोणता निर्णय शिवसेना घेईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Visit : Bahujannama.com
- जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार
‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जा