जयपूर राजस्थान : वृत्तसंस्था – मुख्यमंत्री गहलोत यांनी एक मोठा निर्णय घेत ३० फूट महामार्गावरील बार परवान्याची अधिसूचना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गेहलोत यांनी हे आदेश दिले आहेत.
त्यांच्या या निर्णयावर दारूबंदी समर्थक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री गहलोत म्हणाले की, ‘दारू प्रतिबंधक धोरणाचे काटेकोरपणे पालन करण्यास राज्य सरकार कोणतीही कसर सोडणार नाही.’ गहलोत यांनी राज्यातील उत्पादन शुल्क विभागाला पोलिसांच्या दबावगटापासून मुक्त, प्रणालीत पारदर्शकता व प्रभावी सुधारणेसाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
तरुण पिढीला ड्रग्सपासून लांब ठेवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच रात्री आठ वाजल्यानंतर दारूची दुकाने बंद ठेवणे, ई-सिगारेट बंद करणे, हुक्का बार बंद ठेवणे अशासारखे कडक निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचा परिणाम सामान्य लोकांमध्ये दिसून आला.
या उच्चस्तरीय बैठकीत सीएस, एसीएस फायनान्स, एसीएस गृह व वित्त व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते.