बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यसोबतच देशातील नागरिकांना जादा परतावा देण्याच्या बहाण्याने आर्थिंक फसवणूक करणाऱ्या समृद्ध जीवन फुड्स इंडिया व मल्टी स्टेट मल्टी पर्पज कंपनीच्या दोन संचालकांना सीआयडीने अटक केली. दोघे गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार होते. त्यांनी गुंतवणूकदारांना परतावा न देता तब्बल ३ हजार ७०० कोटींची फसवणूक केली आहे.
ऋषीकेश वसंत कणसे (वय ३०) आणि सुप्रिया वसंत कणसे (वय ३६ ) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. यापुर्वी मुख्य आरोपी महेश मोतेवार, वैशाली मोतेवार, लिना मोतेवार, प्रसाद पारसवार, सुवर्णा मोतेवार, अभिषेक मोतेवार, विशाल चौधरी यांच्यासह इतर आरोपींनी अटक करण्यात आली होती.
सीआयडीने दिलेल्या माहितीनुसार, समृद्ध जीवन फुड्स इंडिया व मल्टी स्टेअ मल्टी पर्पज कंपनीने पशुधन विक्री, संगोपन, खरेदी विक्रीच्या योजना सुरु केल्या होत्या. त्यावर नागरिकांनी कंपनीने आकर्षक जादा परतावा दिला होता. त्यासाठी कंपनीनेे कमिशन देउन एजंटांची नियुक्ती केली होती. राज्यासह देशभरात विविध आकर्षक कार्यक्रम आयोजित करत गुंतवूणकीचे आवाहन केले होते. त्यानंंतर जादा परतावा मिळण्याच्या अपेक्षेने हजारो नागरिकांनी कंपनीत कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, एकही रुपयांचा परतावा कंपनीने ठेवीदारांना न देता तब्बल ३ हजार ७०० कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केली. त्यानंतर याप्रकरणी सीआयडीने कंपनीच्या मालकासह इतर आरोपींना अटक केली होती. मात्र, ऋषिकेश व सुप्रिया पाच वर्षांपासून फरार होते. सीआयडीकडून त्यांचा तपास करण्यात येत होता. अखेर त्यांना पुण्यातून अटक करण्यात आली.
सीआयडीचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, पोलीस उपअधीक्षक उत्तम वाळके, पोलीस निरीक्षक शैलेजा बोबडे, पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, राहूल कदम, निनाद माने, भूषण पवार, कविता नाईक यांच्या पथकाने केली.