बीजिंग : वृत्तसंस्था – जगातील दुसर्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनला मोठा झटका बसला आहे. अमेरिकेबरोबर सध्या सुरू असलेल्या ‘ट्रेड वॉर’मुळे चीनमधील औद्योगिक उत्पादन १७ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक उत्पादनाचा विकास दर ऑगस्टमध्ये साडे १७ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला. आकडेवारीनुसार जुलै महिन्यात चीनच्या औद्योगिक उत्पादनाचा विकास दर ४.४ टक्के राहिला आहे. फेब्रुवारी २००२ नंतरची ही सर्वात नीचांकी पातळी आहे.
जगातील पुरवठा साखळीशी चिनी उद्योग बरेच जोडलेले आहेत. गेल्या शतकाच्या अखेरीस चीनकडे जगातील सुमारे ७ टक्के आर्थिक हिस्सा होता. यावर्षी हा आकडा १९ टक्के राहण्याची शक्यता आहे. जगातील अनेक उत्पादनांची किंमत चीनच्या अर्थव्यवस्थेद्वारे निश्चित केली जाते. जगात उत्पादित स्टील, तांबे, कोळसा आणि सिमेंटपैकी निम्मे चीनमध्ये जाते. अशा परिस्थितीत चीनने या वस्तू खरेदी करणे बंद केले तर किंमती खाली येण्याची खात्री आहे. त्यामुळे चीनमधील मंदीमुळे जगभरात चिंता वाढत आहे.
भारतावर काय परिणाम होईल ?
भारताच्या आयातीमध्ये चीनचा मोठा वाटा आहे. हा भाग १६ टक्क्यांहून अधिक आहे. चीन निर्यातीत चौथ्या क्रमांकाचा बाजार आहे. भारताच्या निर्यातीत चीनचा वाटा ४.३९ टक्के आहे. त्यामुळे भारतावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे, भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे चिनी कंपन्यांमध्ये गुंतवणूक एक उत्तम पर्याय बनू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
चिनी कंपन्या भारतात विक्री केलेल्या उत्पादनांचे उत्पादन भारतात सुरू करू शकतात. पायाभूत सुविधांच्या बाबतीतही चिनी कंपन्यांची मदत भारताला मिळणार आहे.
भारतीय अर्थव्यवस्था चीनपेक्षा पुढे असेल – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) प्रवक्ते गेरी राईस यांनी नुकतेच म्हटले आहे की भारत चीन पेक्षा पुढे आणि जगातील सर्वात वेगाने वाढणार्या मोठ्या अर्थव्यवस्था बनणार आहे.
गेरी राईस म्हणाले, “आम्ही नवीन आकडेवारी सादर करणार आहोत पण भारतातील अलीकडील आर्थिक वाढ अपेक्षेपेक्षा खूपच कमकुवत आहे, विशेषत: कॉर्पोरेट आणि पर्यावरणीय नियामकांच्या अनिश्चिततेमुळे आणि काही नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या कमकुवततेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.