नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनी सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने एका संपादकीय मध्ये म्हटले आहे की, जर भारताला त्यांच्यासोबत प्रतिस्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर चीन मागच्यापेक्षा जास्त त्यांच्या लष्कराचे नुकसान करण्यात सक्षम आहे. दरम्यान, 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा चीनने प्रयत्न केला होता, परंतु भारतीय जवानांनी त्यांना पिटाळले. चीनी मीडियात यावरून प्रतिक्रिया दिसून येत आहे. लडाखमध्ये दोन्ही देशांमधील ही नवी झटापट पँगोंग सरोवराच्या दक्षिण किनार्यावरील एका टेकडीवरून झाली.
घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, चीनी लष्कराने एलएसी (लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल) ओलांडली नाही. याच दिवशी, चीनी लष्कराच्या प्रवक्त्याने मागणी केली होती की, भारताने आपले लष्कर मागे घ्यावे. चीनने भारतीय लष्करावर अवैध प्रकारे आपल्या सीमेत प्रवेश केल्याचा कांगावा सुद्धा केला आहे.
ग्लोबल टाइम्सने आपल्या संपादकीयमध्ये लिहिले आहे की, भारताने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, त्यांनी लष्कराच्या हालचाली थांबवल्या. यावरून समजते की, भारतीय लष्कराने विध्वंसक पाऊल उचलले आणि भारतीय सैनिकांनीच यावेळी संघर्ष सुरू केला.
ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे, भारत आपल्या अंतर्गत समस्यांनी त्रस्त आहे, विशेषकरून कोरोना व्हायरसची स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. रविवारी भारतात कोरोनाची 78,000 नवी प्रकरणे नोंदली गेली आहेत. अर्थव्यवस्थेची स्थिती खराब आहे. सीमेवर भडकावण्याच्या हालचाली करून भारत आपल्या घरगुती समस्यांवरून नगारिकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे.
संपादकीयमध्ये लिहिले आहे, या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे की, भारत एक शक्तीशाली चीनचा सामना करत आहे. पीपल्स लिब्रेशन आर्मीजवळ देशाच्या एक इंच-इंच जमीनीचे रक्षण करण्यासाठी योग्य प्रमाणात फोर्स आहे. चीनचे लोक भारताला संघर्षासाठी भडकावण्यास इच्छूक नसले तरी त्यांच्या भू-भागावर अतिक्रमण करण्याची परवानगी कधीही देणार नाहीत. चीनची जनता आपल्या सरकारसोबत मजबूतीने उभी आहे.
चीन दक्षिण-पश्चिम सीमाभागात रणनितीदृष्ट्या मजबूत आहे. जर भारताला शांततापूर्ण सहअस्तित्व हेव असेल तर त्याचे स्वागत आहे. परंतु भारताने कोणत्याही प्रकारचे आव्हान दिले तर चीनकडे भारताच्या तुलनेत जास्त शस्त्र आहेत. जर भारताला लष्करी क्षमतेचे प्रदर्शन करायचे असेतल तर पीएलए भारतीय लष्कराचे 1962 पेक्षा जास्त नुकसान करेल.
ग्लोबल टाइम्सने अमेरिकेचा उल्लेख करत म्हटले आहे की, भारताला अमेरिकेचे समर्थन घेऊन कोणताही भ्रम बाळगण्याची गरज नाही आणि चार देशांशी आघाडी करून सहकार्य वाढवण्याची गरज नाही. चीन-भारताचा मुद्दा द्विपक्षीय आहे. अमेरिका केवळ शाब्दिक स्तराव भारताचे समर्थन करू शकते. अमेरिका चीनी भाग बळकावण्यासाठी भारताची मदत कशी करेल? अमेरिकेच्या डोक्यात हे सुरू आहे की, भारत आणि चीन एकमेकांमध्ये व्यस्त राहावेत, जेणेकरून चीनला रोखण्यासाठी भारताला मोहरा म्हणून वापरता येईल.
पँगोंग लेकमध्ये झालेला संघर्ष दर्शवतो की, भारताने गलवान खोर्यातून कोणताही धडा शिकलेला नाही. त्याला अजूनही चीनला भडकवायचे आहे. 2017 मध्ये डोकलामच्या नंतर भारत-चीन सीमेवर तणाव आहे. हा वाद वाढू शकतो आणि अनेक लहान-मोठी संकटे सामान्य बाब होतील. आपल्याला यासाठी तयार राहावे लागेल.
ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, चीन-भारत सीमावर्ती भागात लष्करी संघर्षासाठी चीनला तयार राहावे लागेल. आपल्याला शांतते मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल, पण भारत सतत चीनला आव्हान देणे सुरूच ठेवत असेल तर चीन सुद्धा नरमाईचे धोरण ठेवून चालणार नाही. गरज पडल्यास लष्करी कारवाई केली पाहिजे आणि हे ठरवले पाहिजे की, यामध्ये यशस्वी सुद्धा झाले पाहिजे.
ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, चीन भारतापेक्षा अनेक पट शक्तीशाली आहे आणि भारताची चीनशी कशातच तुलना होत नाही. आम्हाला भारताचा गैरसमज दूर केला पाहिजे की, तो अमेरिका आणि अन्य शक्तींच्या बळावर चीनला तोंड देऊ शकतो.