बहुजननामा ऑनलाइन – चंद्रपूर (Chandrapur) व गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. समिती दीड महिन्यात अहवाल सादर करील, अशी माहिती चंद्रपूर(Chandrapur) चे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्यामुळे दारूबंदी उठवण्यासाठी हालचालींना वेग आला आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दारुबंदी उठविण्याबाबत मंत्रालयात काल एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत दोन्ही जिल्ह्यांतील दारूबंदी उठविण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. बैठकीला उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांतील दारूबंदी उठवण्यात यावी,
यासाठी राज्य सरकारकडे 2 लाख 40 हजार निवेदन प्राप्त झाली आहेत. तर दारूबंदी उठवू नये यासाठी 25 हजार निवेदने प्राप्त झाली आहेत. तेव्हापासून वडेट्टीवार यांनी दारूबंदी मागे घेण्यात यावी यासाठी प्रयत्न चालवले आहेत. दरम्यान, समितीचा अहवाल आल्यानंतरच योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.