नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – आपल्या मुख्यमंत्री पदाची पाच वर्ष यशस्वीरित्या पुर्ण केले. भविष्यातही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील आणि सर्वाधिक काळ महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपदाचा विक्रमही ते मोडतील असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या ‘महाजनादेश यात्रे’चा नाशिकमध्ये समारोप होणार आहे. याप्रसंगी भाजपच्या सर्वच नेत्यांनी पुन्हा सत्ता संपादन करण्याचा निश्चय केला आहे. मात्र शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत आहे. त्यामुळे पाटील यांनी युतीच्या घोषणेपुर्वीच मुख्यमंत्रिपदावर भाष्य केल्याने शिवसेनेची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.
शिवसेना आणि भाजपच्या युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्यापुर्वीच शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी ‘जर युतीत शिवसेनेला समान जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटेल,’ असं बोलून खळबळ उडवून दिली होती. त्यावर संजय राऊत यांनी ‘भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आधी ५०-५० चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यामुळे दिवाकर रावते जे बोलले त्यात काहीही चुकीचं नाही.’ असे वक्तव्य करुन त्यांचे समर्थन केले होते.
राज्यभरात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत असताना भाजप शिवसेनेची युती तुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जागावाटपावरून भाजप सेनेमध्ये अद्यापही वाद सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होणार का नाही? याबाबत अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जागावाटपाचा फार्म्युला समसमान असणार की शिवसेनेला भाजप ११५ते १२० मतदारसंघच देणार, यावर सध्या मोठा सस्पेन्स आहे.
Visit : bahujannama.com