मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आणि ते न्यायालयात भक्कमरित्या टिकवल सुद्धा पण या लबाड सरकारने मराठा समाजासाठी काय केले?, असा सवाल चंद्रकात पाटील Chandrakant Patil यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.
मराठा आरक्षण याचिकांवर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्यात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी यावरूनच सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेसवर टीका केली आहे. तुम्हा प्रस्थापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचे नव्हते. राज्यात 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे हेच तुमचे धोरण होते, असे पाटील यांनी म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजपा सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.