बहुजननामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशातील चांदोली येथे जय श्री राम न म्हणल्याने एका अल्पवयीन तरुणाला जिवंत जाळण्यात आले. सध्या त्या तरुणाची अवस्था गंभीर आहे. त्याचे BHU च्या ट्रामा सेंटरमध्ये उपचार चालू आहे. अल्पवयीन तरुणाचा दावा आहे की, जय श्री राम न बोलल्यामुळे त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, अल्पवयीन तरुण वारंवार त्याचा जबाब बदलत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, चांदोलीचे एसपी संतोष कुमार सिंह यांनी म्हणले की, तरुणाने सगळ्यात पहिले सांगितले की, तो महाराजपुर गावाच्या दिशेने पळत गेला होता. तिथे त्याला चार लोक भेटली. त्या चार लोकांनी त्याला खेचून शेताच्या दिशेने नेले आणि त्याच्या अंगावर रॉकेल टाकून आग लावली.
तरुणाने सांगितले की, तो दुधारी पुलावर फिरण्यास गेला होता जिथे त्याला चार लोकांनी त्याला किडनॅप केले आणि त्याच्या अंगावर रॉकेल टाकून त्याला जाळले. त्याने सांगितले की, त्या आरोपींनी आपल्या तोंडाला रुमाल बांधला होता. त्यामधील एक म्हणाला की, याच्यावर रॉकेल टाकून त्याला जाळून टाका म्हणजे हा मरेल. यानंतर माझ्या अंगावर रॉकेल टाकून आग लावून पळून गेले. ते लोक म्हणत होते की, ‘जय श्री राम बोल..मी बोललो नाही त्यामुळे मला मारायला सुरुवात केली.’
एसपी संतोष कुमार सिंहने मुलाखतीमध्ये सांगितले की, जेव्हा तरुणाशी जिल्हा रुग्णालयामध्ये चर्चा केली तेव्हा त्याने सांगितले की, सुनील नावाचा एक व्यक्ती त्यामध्ये सामील होता. तरुणाने घटनास्थळ छतेल गाव सांगितले. छतेल गाव मनराजपुर गावापासून २ किलोमीटर लांब आहे. तरुणाने सांगितले की, ते ४ लोक होते आणि दुचाकीवर आले होते. त्या चार लोकांनी त्याला हतीजा गावाच्या दिशेने घेऊन गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ते गाव वेगळ्या दिशेने आहे.
पोलिसांनी दावा केला आहे की, या तीन लोकेशनची चौकशी केल्यानंतर त्यांनी या तीन लोकेशनवर लावलेले कॅमेरा फुटेज पाहिले तेव्हा तो तरुण त्यामध्ये दिसला नाही. एसपी यांचे म्हणणे आहे की, तीन वाजेपर्यंत या घटनेमध्ये जय श्री राम सारखी कोणती गोष्ट नव्हती. त्यांचा दावा आहे की, काही लोकांनी अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या आईला भीती दाखविली की, जर या घटनेला जय श्री रामच्या घोषणेने जोडले गेले तर हे प्रकरण मोठे होईल आणि त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळेल. यानंतर या लोकांनी पुर्ण भूमिका वळवली.
एसपी संतोष, कुमार सिंह यांचे म्हणणे आहे की, चौकशी दरम्यान समजले की, घटनास्थळापासून १.५ किलोमीटर लांब मजारजवळ हा तरुण सकाळी ४ वाजता तिथे पोहचला असावा. याचदरम्यान एक पत्रकार तिथे ४ वाजून २५ मिनिटाने पोहचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पत्रकार सकाळी पेपर घ्यायला गेला होता. पोलिसांचा दावा आहे की, त्या पत्रकाराने पाहिले की, एक तरुण आपल्या अंगावर रॉकेल टाकून आग लावून पळत आहे. त्याने त्या तरुणाला वेडे समजले. दिनेश मौर्या नावाचा पत्रकाराचे विधान घेतले जाऊ शकते. या पत्रकारने सांगितले की, त्या ठिकाणी कोणीच नव्हते.
चांदोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, त्या तरुणाने सुनील नावाच्या ज्या आरोपीचे नाव सांगितले आहे त्याच्या वडिलांनी या तरुणाच्या परिवाराची तक्रार पोलिसांकडे नोंदविली होती. पोलिसांचा दावा आहे की, कदाचित या तरुणाने तंत्र- मंत्र करुन स्वतःला पेटवून घेतले असेन. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.