हैदराबाद : बहुजननामा ऑनलाईन – एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया या योजनेच्या नावाने हजारो कारखाने बंद पडले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकार या कारखान्यांना कर्ज देऊ शकत नाही का? असा प्रश्नही ओवेसी यांनी यावेळी उपस्थित केला. तर छोटे छोटे उद्योजक जीएसटीमुळे कोलमडून पडले आहेत ,असा टोलाही ओवेसी यांनी लगावला
यापूर्वी पुलवामा हल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. पुलवामा हल्ल्यावेळी मोदी बीफ बिर्याणी खावून झोपले होते का? अशी टीका ओवेसी यांनी केली होती. मोदी सगळीकडे फिरत सांगतात कि मी चौकीदारआहे त्यांना चौकीदारची शिट्टी आणि टोपी देणार असल्याचेही ते बोलले तर बालाकोट मध्ये ३०० मोबाईल असल्याचे पाहू शकतो, मात्र पुलवामा येथे ५० किलो आरडीएक्स पोहचले हे तुम्ही का पाहिले नाही? असा प्रश्न ओवेसी यांनी यावेळी उपस्थित केला होता.