बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत, यावेळी केंद्र सरकारने राष्ट्रीय रेल्वे योजना 2030 पूर्णपणे तयार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी 1.10 लाख कोटींचे बजेट केंद्र सरकारकडून रेल्वेला देण्यात आले आहे.
अर्थसंकल्पात हायवे प्रकल्पावरही भर दिला आहे. तामिळनाडू नॅशनल हायवेसाठी 1.03 लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये इकॉनोमिक कॉरिडोर बनवला जाईल, केरळमध्ये 65 हजार कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग उभारले जातील, मुंबई-कन्याकुमारी इकॉनॉमिक कॉरिडोरची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये कोलकता-सिलीगुडी नॅशनल हायवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. तसेच आसाममध्ये पुढील तीन वर्षात हायवे आणि इकॉनोमिक कॉरिडोर बनवण्याची घोषणा करण्यात आली.