नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – समाजात परिवर्तन घडविण्यासासाठी पहिल्यांदा स्वत:मध्ये बदल करणे जरुरीचे असते. त्याचे अनुकरण करीत समाज बदलतो. बुद्धविहार हे परिवर्तन व मानव घडविण्याचे केंद्र आहे, असे प्रतिपादन पुणे येथील त्रिरत्न बौद्ध महासंघाचे अध्यक्ष धम्मचारी मैत्रिनाथ यांनी केले.
मोरभवन येथे बुद्धविहार समन्वय परिषदेतर्फे आयोजित दोनदिवसीय समन्वय परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. महास्थवीर भदन्त शीलरक्षित, धम्मसारथी, धम्मप्रकाश संघरत्न, प्रज्ञाशील, बुद्धप्रिय, महानाम, हिंगोलीचे जमाजी पाईकराव, औरंगाबादचे जी. एस. कांबळे, नागपूरचे सुधाकर चौधरी, प्रभाकर कुंभारे व्यासपीठावर होते.
धम्मचारी म्हणाले, धम्म हा केंद्रस्थानी आहे. त्याचा जीवनावर प्रभाव झालाच पाहिजे. जर धम्माचा प्रभाव जीवनावर होत नसेल तर तो धम्मच नाही. सिद्धार्थाने गृहत्याग करून दु:ख निवारण्याचा मार्ग शोधला. तोच मार्ग समाजाच्या उद्धारासाठी अडीच हजार वर्षांपूर्वीपासून बुद्ध धम्माच्या विचारांवर चालत होता. कट कारस्थानातून बुद्ध धम्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तो धम्म पुनरुज्जीवित करण्याचे काम डॉ. बाबासाहेबांनी केले. आजसुद्धा विहारामध्ये बौद्ध भिक्खूचे पुरावे आढळतात. बुद्धविहाराने आयुष्य घडते. यावेळी जमाजी पाईकराव, सुधाकरराव चौधरी, प्रभाकर वुंष्ठभारे, जी. एस. कांबळे यांनी आपले विचार मांडले. संचालन घनश्याम धाबर्डे यांनी केले तर आभार ए. के पाटील यांनी मानले.
डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून पहिल्यांदाच हिंदू नाकारला होता. ज्या मनुस्मृतीने कित्येक वर्षे अस्पृश्य समाजावर अन्याय, अत्याचार केला त्यातून मुक्तकरण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी केले. पण, आजही काही बांधव हिंदू धर्माच्या परंपरेने वागतात, असा आरोप त्यांनी यावेळी केला.