नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – आपल्या सासुरवाडीत सासू-सासरे, नणंद आणि नवऱ्याची मारहाण आणि अत्याचार सहन करणारी महिला आपला जीव मुठीत ठेवून आयुष्य काढत होती. त्यात तिच्या दिराची तिच्यावर वाईट नजर होती. एके दिवशी त्यांनी तिला पाहिले. मग एके दिवशी संधीचा फायदा घेत तिच्या दिराने तिच्यावर अत्याचार केले. जेव्हा त्या महिलेने आपल्या पतीकडे यासंदर्भात तक्रार केली तेव्हा तिच्या नवऱ्याने तिलाच ऐकवायला सुरुवात करत सांगितले कि, “माझ्यात आणि माझ्या भावामध्ये काय फरक आहे?”
महिलेला निर्घृणपणे मारहाण :
महिलेने जेव्हा यासंदर्भात आवाज उठवला त्यावेळी तिच्यावर निर्घृणपणे हल्ला करण्यात आला. घराबाहेर काढण्यात आले. अत्याचाराला कंटाळून महिलेने महेर गाठले आणि काही दिवस हे प्रकरण लपविण्याचा प्रयत्न केला. परंतु एक दिवस तिने हिम्मत करत जैतपूर पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली.
या प्रकरणात पीडित मुलीने ९ नोव्हेंबर रोजी जैतपूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची विनंती केली होती. परंतु कारवाई तर दूरच, १० दिवसानंतरही एफआयआर दाखल करण्यात आली नाही.