मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारी पुस्तिका काँग्रेसने वाटल्यानंतर त्यावरून बराच वाद झाला. यावरून शिवसेनेने काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे. सावरकर महान होते व आहेत. तसेच त्यांची अशी बदनामी करणारी घाण आम्ही महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असे बोल शिवसेनेने काँग्रेसला सुनावले आहेत.
सावरकरांची ही पुस्तिका काँग्रेस सेवा दलाच्या कार्यक्रमात वाटली गेली होती. त्यावर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी काँग्रेसवर हल्ला चढवून महाराष्ट्रात मुख्यमंत्री ठाकरे यांना या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यावर संजय राऊत यांनी आमची श्रद्धा अशा प्रकारच्या फालतू पुस्तकामुळे कमी होणार नाही, असे काँग्रेसला ऐकवले आहे.
हे पुस्तक बेकायदेशीर असून त्यावर बंदी असतानाही तशी पुस्तकं वाटली जातात. याअगोदर भाजप नेत्यांची पुस्तकही वाटली गेली आहेत. महाराष्ट्रात हे पुस्तक खपवून घेणार नाही. भाजपची ही घाण महाराष्ट्रात येऊ देणार नाही आणि सावरकर देशाला प्रिय आहेत व राहतील, असे राऊत यांनी सांगितले. भोपाळमध्ये काँग्रेसचे गोपाळराव कोण आहेत, हे कोणालाही माहित नाही. सावरकरांविषयी आम्हाला कोणीही ज्ञान देऊ नये. सावरकरांबाबत शिवसेनेची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. तरीही तुम्ही वारंवार का विचारता ? सावरकरांबाबत पूर्ण देशाला अभिमान आहे, असेही राऊत म्हणाले.
Visit : bahujannama.com