बहुजननामा ऑनलाईन – शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मोडीत काढण्याची भाजपाची नीतीइंदापूर: बहुजननामा ऑनलाईन -२०१४ साली भाजपा-शिवसेना सरकारने लोकांना अनेक योजनांमार्फत खोटी आश्वासने दिली. त्या योजनांना बहुरंगी नावे दिली मात्र त्याचा उपयोग जनतेला झालाच नाही ही खंत आहे. शाहू-फुले-आंबेडकरी विचार मोडीत काढण्याची भाजपाची नीती आहे. अशा फसव्या आणि जातीचे राजकारण करणाऱ्या सरकारला बाजूला काढण्यासाठी देशातील समविचारी पक्ष एकत्र आले, आता १३६ कोटी जनतेने यावर विचार करून सत्तापालट करण्याची भूमिका बजवावी ,असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
सध्याच्या सरकारचा शेती व दुष्काळाशी काडीमात्र संबंध नाही, यांच्या काळात आत्महत्येचा आकडा १५ हजारावर गेला. तसेच शेतमालाला भाव मिळत नाही दुधाला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल अवस्थेत आहे .पिकविमा योजनेमार्फत विमा कंपनीचे फायदा कसा होईल हाच विचार मोदी सरकार करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चेष्टा येथील पाच वर्ष सत्तेत राहिलेल्या युती सरकराने केली असल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला . ते पुढे बोलताना म्हणाले, मोदी यांच्या सरकारने पाच वर्षात देशाच्या लबाड उद्योगपती १५ कुटुंबियांचे पैसे माफ केले. मात्र संयुक्त महाआघाडीने देशाच्या करोडो शेतकऱ्यांचे पैसे माफ करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.