लखनौ : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या असताना जवळ- जवळ सर्व पक्षानी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पण भाजपचा जाहीरनामा निवडणुका झाल्यावर येणार का? असा प्रश्न करत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्या पक्षाची खिल्ली उडवली आहे. भाजपचा अच्छे दिनवाला जाहीरनामा कुठे आहे ? असा सवाल त्यांनी केला आहे.
या लोकसभेमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसचा जाहीरनामा देशभरात मोठ्या चर्चेचाही विषय बनला आहे. मात्र भाजपने अजून जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. त्यापार्श्वभूमीवर अखिलेश यांनी आपल्या ट्विटरवरून भाजपला लक्ष्य केले आहे. पंतप्रधानांचा अच्छे दिनवाला जाहीरनामा निवडणुकीनंतर येणार का ? अशी विचारणा विकास करत आहे. यावेळी अच्छे दिन आने वाले हैं असे भाजपवालेही एकमेकांना सांगू शकत नसल्याचे चित्र आहे. मग ते जनतेला तसे कसे काय सांगणार. असा सवाल अखिलेश यांनी केला.
https://twitter.com/