नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या ८८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रामदास आठवले यांनी पत्रकार परिषेदेमध्ये बोलतांना २०१४ मध्ये आरपीआय (ए )युतीत असल्यामुळे भाजपा-सेनेला मागासवर्गीयांची मते मिळाली होती.त्यामुळे ते सत्तेत आले होते. हा इतिहास विसरता कामा नये हे त्यांनी लक्षात ठेवावे. २०१९ साठी युतीमध्ये आरपीआयला सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. अन्यथा राजकीय चित्र वेगळे असेल. असा भाजपा-सेनेला इशारा आठवले यांनी दिला.
काळाराम मंदिर सत्याग्रहाला ८८ वर्ष पूर्ण होण्याच्या पार्शवभूमीवर रामदास आठवले यांनी २ मार्चला नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन केले. व त्याला मोट्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद दिला. हि सभा काळाराम मंदीर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने ही अभिवादन सभा गोल्फ क्लबच्या ईदगाह मैदानावर पार पडली.
आठवले बोलताना म्हणाले कि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सामील व्हावे यासाठी आ. छगन भुजबळ यांनी मध्यंतरीच्या काळात माझ्याशी चर्चा केली. पण पक्षातील कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केल्यानंतर युतीसोबत राहण्याचा निर्णय मी घेतला आहे