बहुजननामा ऑनलाइन : आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीहून इतरत्र स्थलांतरित करण्याच्या बातमीमुळे सत्ताधारी वाईएसआर कॉंग्रेस आणि तेलगू देसम पार्टी (टीडीपी) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दोन पक्षांमधील या शाब्दिक चकमकी दरम्यान भाजपच्या खासदाराच्या वक्तव्यामुळे आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वायएसआरचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केंद्र सरकारकडे राज्याची राजधानी अमरावतीहून स्थलांतरित करण्याची योजना आखली असल्याचे भाजपचे राज्यसभेचे खासदार टीजी वेंकटसन यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना भाजपचे राज्यसभेचे खासदार वेंकटेशन यांनी असा दावा केला की, रेड्डी राज्यात चार राजधानी बनविण्याच्या तयारीत आहेत. ते म्हणाले की, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी राज्यातील सर्व भागाचा योग्य विकास सुनिश्चित करण्यासाठी विजयनगरम, काकीनाडा, गुंटूर आणि कडप्पा यांची राजधानी म्हणून तयार करण्याच्या विचारात आहेत. जगनमोहन रेड्डी सत्तेबाहेर असताना त्यांनी अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी बनवण्यासाठी टीडीपीला विरोध केला. वेंकटेश म्हणाले की, टीडीपीने त्या वेळी घेतलेल्या या निर्णयाला येथील लोक व शेतकर्यांनीही विरोध दर्शविला होता. वेंकटेश म्हणाले की, माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या या निर्णयामुळे त्यांचा मुलगा नारा लोकेश यांना निवडणूक हरवावी लागली.
भाजपचे राज्यसभेचे खासदार म्हणाले, “मला भाजप नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जगनमोहन रेड्डी यांच्या वरिष्ठ नेत्यांशी याबद्दल बोललो आहे. जगन यांनी राज्यात चार राजधान्यांच्या निर्मितीची माहिती वरिष्ठ नेत्यांना दिली आहे. तथापि, ज्या नेत्यांकडून मला ही माहिती मिळाली, त्यांची नावे मी सार्वजनिकपणे सांगू शकत नाही.