बहुजननामा ऑनलाईन – संसदेत आता तिहेरी तलाक कायदा मंजूर झाला आहे. तर यावर विविध स्तरावरून अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तिहेरी तलाक कायद्यावर ओडिशाच्या भाजमधील आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. तिहेरी तलाक या कायद्यामुळे मुस्लीम महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त व्हावे लागत आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विष्णू सेठी असा या आमदाराचे नाव आहे.
अनेक स्तरावरून टीका होत असतानाही ते मात्र आपल्या विधानावर ठाम आहेत. याविषयी बोलताना विष्णू सेठी म्हणाले, मी काहीही चुकीचे बोललेलो नाही. एवढेच नाही तर अनेक रिपोर्ट्स मध्येही दावा देखील करण्यात आला आहे की, तीन तलकमुळे महिलांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते. त्यांच्या या विधानावर भाष्य करत काँग्रेसचे आमदार नरसिंह मिश्रा यांनी म्हटले की, भाजप हा एक जातीयवादी पक्ष असून या पक्षाचे नेते संसदेत देखील सर्वांना बदनाम करण्याचे प्रयत्न करत असतात. भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष असल्याने ते नेहमी वाद निर्माण होतील असे विधाने करत असतात. राज्यात होणाऱ्या मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक वाद निर्माण होण्यामागे हेच कारणीभूत आहेत.
संसदेच्या दोन्ही सभागृहात तीन तलाक विधेयक मंजूर झाले असून आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रूपांतर देखील करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे मुस्लिम पुरुषांना तीन वेळा तलाक म्हणून आपल्या पत्नीला घटस्फोट देता येणार नाही. जर ते झाल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.