बहुजननामा ऑनलाइन – भाजपाने सत्ता स्थापन करण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र, त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. सत्ता हातातून जाताच भारतीय जनता पक्षामध्ये मतभेद वाढण्यास सुरुवात झाली आहे. याचे उदाहरण म्हणजे पहिले एकनाथ खडसे आणि त्यांच्यानंतर आता पंकजा मुंडे आणि आता प्रकाश मेहता यांनी मतभेद करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये माजीमंत्री विनोद तावडे देखील सहभागी होते. मात्र त्यानंतर त्यांनी ऐनवेळी माघार घेत आपण आहे त्यातच आनंदी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खडसे, मुंडे आणि मेहता या तीन नेत्यांनी बंडखोरी केली नसली तरी आपली नाराजी व्यक्त केली आहे. नाराजी व्यक्त करणाऱ्या तिन्ही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले गेले आहे.
या तीन नेत्यांवर झोपडपट्टी पुर्नविकास योजना राबविता विकासाला झुकते माप दिल्याचा आरोप होता. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात मेहता यांची मंत्रीपदावरून उचलबांगली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना तिकीट देखील नाकारण्यात आले. त्यामुळे ते पक्षावर नाराज होते. अर्थात बंड न करता पक्ष नेतृत्वाविरुद्ध भूमिका घेणारे खडसे, मुंडे आणि मेहता तिन्ही नेत्यांवर आधीच भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तेत आलेल्या भाजपाच्या 2014 ते 2019 या कालावधीत एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि प्रकाश मेहता हे मंत्रीपदी विराजमान होते. त्याच काळात या तिन्ही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. यामध्ये सर्वप्रथम नंबर लागला तो म्हणजे एकनाथ खडसे यांचा, पुण्यातील एमआयडीसीत त्यांनी जमीन घेतल्याचा आणि दाऊतशी संपर्क असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांचा मंत्रीमंडळात पुन्हा सामावेश करण्यात आला नाही. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीट देखील नाकारण्यात आले त्यामुळे ते नाराज होते. माजी महिला व बालकल्याणमंत्री पंकडा मुंडे यांच्यावरही चिक्की घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे ते अडचणीत आल्या होत्या. यावरून तत्कालीन विधान परिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांना अनेकदा लक्ष्य केले होते. मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लिनचिट दिली.