नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व कायद्यावरून सध्या देशात चांगलाच वाद पेटला आहे. अशातच भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते बी. गोपालकृष्णन यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. इंडियन यूनियन मुस्लीन लीगने जातीयवादी तत्वांना हटवले असून देशात राहणाऱ्या हिंदूंना धमकी देणाऱ्यांना आम्ही पाकिस्तानात पाठवू, असे विधान गोपालकृष्णन यांनी केले आहे.
नागरिकत्व कायद्याचे समर्थन केले म्हणून केरळमधील एका हिंदू मालकाचे हॉटेल काही लोकांनी धारेवर धरले. तसेच त्या हॉटेलचे मालक हे त्रिशूराचे रहिवाशी असून त्यांनी नागरिकत्व कायद्याचे समर्थन केले होते, असेही गोपालकृष्णन म्हणाले.
मुख्यमंत्री पी.विजयन यांनी एनपीआर प्रक्रिया चालू करावी. जर प्रक्रिया सुरु केली नाही तर केरळ राज्यातील राशन बंद केले जाईल, अशा शब्दात गोपालकृष्णन यांनी धमकी दिली आहे.
Visit : bahujannama.com