बहुजननामा ऑनलाइन टीम – बिहार विधानसभा (Bihar election) निवडणुकीत शिवसेनेचे पानीपत झाले. त्यांच्या उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाल्याने भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर जोरदार टीका ( Criticizes Shivsena on Bihar election) केली जात आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात हातात “धनुष्यबाण” धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रातसुद्धा जनतेच्या “घड्याळाचे” काय सांगावे टायमिंग? अशी टीका भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar ) यांनी सरकारमधील तिन्ही पक्षांवर केली.
महाराष्ट्रात कॉंग्रेसने हातात धनुष्यबाण धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रातसुद्धा जनतेच्या घड्याळाचे काय सांगावे टायमिंग.? पंचायत ते पार्लमेंटपर्यंत मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच. त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजी फडणवीस यांचे अभिनंदन, असे ट्विट शेलार यांनी केले आहे. भ्रष्टाचारी काँग्रेससोबत सलगी केलेल्या “जगंलराज का युवराज”ला बिहारच्या जनतेने नाकारले. महाराष्ट्रातपण भ्रष्टाचारी काँग्रेससोबत “जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज” युती करून बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है, असेही शेलार म्हणाले.
भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने बिहारमध्ये 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी हिरिरीने प्रचारही केला होता. मात्र, एकूण 23 जागांपैकी 21 जागांवर सेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.दरम्यान बिहार निवडणुकीत भाजप्रणित एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळाली. ताज्या आकडेवारीनुसार एनडीएने बहुमताचा जादुई 122 आकडा गाठला आहे. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 125 जागांवर एनडीए तर 110 जागांवर महागठबंधनचे उमेदवार विजयी ठरले. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे.