मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या नवीन मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्रि नितीन गडकरींबद्द्ल भाजपच्याच नेत्यांनी अपशब्द वापरले होते. ते आता त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप नेत्यांचे संभाषण सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. पक्षाने याची दखल घेत दोन्ही नेत्यांवर कारवाई केली आहे. हे दोन्ही नेते नागपूरातील भाजपचेच आहेत. दोघांना पक्षातून ६ वर्षासाठी निलंबन केले आहे. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार जयहरी सिंग ठाकूर आणि अभय तिडके असं या दोन्ही नेत्यांचे नाव आहे.
लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागण्याची भविष्यवाणी या नेत्यांनी केली. शिवाय, नितीन गडकरींविरोधात अपशब्द देखील वापरले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी १,९७,००० मतांनी नाना पटोलेंचा पराभव केला आहे.
जयहरी सिंग ठाकूर नागपूर भाजपचे उपाध्यक्ष आहेत. तर, अभय तिडके हे पक्षाच्या एका समितीचे सदस्य आहेत. आपल्याच पक्षातील नेत्याबद्दल बोलतानाचे हे संभाषण आहे. शिवाय आपलाच नेता हारणार, असं म्हणणंही चुकीच आहे. त्यामुळ पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना पदावरून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसनेही खेळी करत नानांना गडकरींच्या विरोधात उभे केले होते. प्रचारादरम्यान, नाना गडकरींवर भारी पडत असल्याचेही चित्र दिसत होते. मात्र निकालात गडकरींचा विजय झाला. त्यानंतर व्हायरल झालेल्या त्या संभाषण करणाऱ्या दोन्ही नेत्यांवर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे.