नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपने आपल्या लोकसभा, राज्यसभा खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. म्हणून आज संसदेच्या दोन्ही सदनातल्या भाजपाच्या खासदारांना सदनात उपस्थित राहणं अनिवार्य आहे.यात आज संसदेत काय होणार हे पाहन महत्वाचं आहे.
भाजप सरकार आज संसदेत महत्वाचं विधेयक मांडण्याची शक्यता आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटीच दिवस आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन संध्याकाळी ४ वाजता मीडियाशी सवांद साधणार आहेत. त्या पत्रकार परिषदेतून अर्थसंकल्पावर उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देतील.
मोदी सरकार संसदेतल्या सर्व खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. त्यामुळे भाजपाचे सर्व खासदार आज संसदेत उपस्थित राहणार आहेत . अर्थसंकल्पीय अधिवेशनात ४५ विधेयकं मंजूर करण्याचं लक्ष्य भाजपानं ठेवलं आहे . यामुळे राज्यसभेत महत्वाचं विधेयक मांडलं जाऊ शकत . पण कोणत्याही भाजप नेत्याला कोणतीही कल्पना दिलेली नाही. सर्वोच्च न्यायालयानं पदोन्नती मूलभूत हक्क नसल्याचं एका निकालात म्हटलं आहे . काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी भाजप आणि संघ आरक्षणविरोधी असल्याची टीका केली आहे . यामुळे मोदी सरकार दलितांची नाराजी दूर करण्यासाठी एखादं महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची शक्यता आहे.