बहुजननामा ऑनलाइन – बिहारचे(bihar assembly election )मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका, राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणं, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची प्रशंसा करून लोक जनशक्ती पक्षाने(लोजप) राज्यात विधानसभा(bihar assembly election )निवडणुकीत 2 महत्त्वाचे संकेत दिले.
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या विरोधात वातावरण असल्याचं लोजपनं हेरलं असून, भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळण्याच्या उद्देशानं तो मदतही करत आहे. लोजप हा पक्ष रालाओ पक्षातून बाहेर बाहरे पडला. याला जनता दल आणि भाजपनं जास्त महत्त्व दिलं नाही. परंतु घटनाक्रम जर पाहिला तर जनता दलाच्या काही जागा खेचण्यासाठी लोजप जो प्रचार करत आहे त्याकडे भाजप लाभाच्या नजरेतून पहात आहे.
नितीश कुमार यांना लक्ष्य करण्यासाठी विरोधी पक्षांना यातून दारूगोळाही मिळणार आहे. लोजपनं हव्या असलेल्या जागा भाजपनं न दिल्याबद्दल टीकाही केली होती. 2015 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोजपनं 243 जागांपैकी फक्त 2 जागा जिंकल्या होत्या. मतांची टक्केवारी होती 4.83 टक्के. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोजपनं लढवलेल्या सहाही जागा जिंकल्या होत्या. त्यात मोदी फॅक्टर कामाला आला होता. विधानसभा निवडणुकीत लोजप 143 जागा लढवणार आहे.