बहुजननामा ऑनलाइन टीम – अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Union finance minister Nirmala Sitharaman) यांनी एका टप्प्यात डझनभर घोषणा केल्या. यात आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची (The Atmanirbhar Bharat Rozgar Yojana ) घोषणा केली आहे. या योजनेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPFO) नोंदणी नसलेल्या आणि 15 हजारांपेक्षा कमी मासिक वेतन असलेले जे कर्मचारी ( Modi government)आहेत, त्यांना लाभ मिळणार आहे.
1 मार्च ते 30 सप्टेंबर या कालावधीत नोकरी गमावली होती आणि 1 ऑक्टोबरनंतर त्यांना नोकरी मिळाली असेल, तर या कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा भार सरकार उचलणार असल्याचे सीतारमण यांनी यावेळी सांगितले आहे. ज्या कंपन्या भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (EPFO) जोडलेल्या आहेत अशा कंपन्यांना नवीन कर्मचारी भरती केल्यास या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना 30 जून 2021 पर्यंत लागू राहील. योजनेत पात्र झालेल्या कंपन्यांना सरकारकडून दोन वर्षे पीएफ अनुदान देण्यात येणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले.
कमर्चारी भविष्य निधी (EPF) फंडात मालक आणि कमर्चारी यांचे प्रत्येकी 12 टक्के योगदान असते. हे प्रमाण दरमहा मूळ वेतनानुसार निश्चित केले जाते. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेनुसार पुढील दोन वर्षे केंद्र सरकारकडून पात्र कंपन्यांना 24 टक्के पीएफ अनुदान दिले जाणार आहे. योजनेत सप्टेंबर 2020 हा महिना ग्राह्य धरला जाणार आहे. एखाद्याला नवीन नोकरी लागली तर सप्टेंबर 2020 नुसार त्याला पीएफ अनुदानाचा लाभ दिला जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. यात कंपन्यांनादेखील अटी आणि शर्थी दिल्या आहेत. ज्या कंपनीत 50 कर्मचारी काम करत आहेत आणि त्यात आणखी दोन नवीन कर्मचारी भरती केले तर दोन नव्या कर्मचाऱ्यांना सबसिडीचा लाभ मिळणार आहे, तर ज्या कंपनीत 50 कर्मचारी आहेत आणि त्यांनी आणखी पाच कर्मचारी नियुक्त केले तर नवीन पाच कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना
1) रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजने’ची घोषणा
2) संघटीत क्षेत्रातील रोजगाराला बळ मिळण्यासाठी या योजनेचा फायदा होणार
3) ईपीएफएओ नोंदणीकृत संस्थांशी जोडल्या गेलेल्या कर्मचाऱ्यांना ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजने’चा फायदा होणार.
4) तसंच या अगोदर जे कर्मचारी ईपीएफओशी जोडले गेलेले नव्हते त्यांना लाभ मिळणार
5)ज्यांनी 1 मार्च ते 30 सप्टेंबर या काळात नोकरी गमावली असेल, त्यांनाही याचा फायदा मिळणार
6) ही योजना 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू होईल. 30 जून 2021 पर्यंत ही योजना सुरू राहील.