बहुजननामा ऑनलाइन टीम – मागील वर्षी केंद्र सरकारने कलम ३७० ( Act 370) रद्द केल्यानंतर मोठा विरोध करण्यात येत आहे. काश्मीरमधील राजकारणी सातत्याने याचा विरोध करत असून, पुन्हा एकदा कलम ३७० लावण्याची भाषा(Biden) करत आहेत. एकीकडे नॅशनल कॉन्फ्रन्स, पीडीपी यांनी गुपकारच्या माध्यमातून कलम ३७० साठी आवाज उठवला असतानाचा काँग्रेसच्या ( Congress) काश्मीरमधील एका नेत्याने या मुद्द्यावरून मुक्ताफळे उधळली आहेत. काँग्रेसचे काश्मीरमधील ( Kashmir) नेते जहांजेब सिरवाल ( Jahnjeb Sirwal) यांनी जो बायडन यांच्या विजयाचा आधार घेत आम्ही बायडेनच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणून जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश दिला आहे. या व्हिडिओत जहांजेब सिरवाल यांनी म्हटले की, अमेरिकेमध्ये जो बायडेन ( Joe Biden) आणि कमला हॅरिस ( Kamla Harris) यांचा झालेला विजय हा लोकशाहीचा विजय आहे. याचा परिणाम भारतीय राजकारणावरसुद्धा होणार आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या राजकारणावरही याचा सकारात्मक परिणाम होईल. सध्या संपूर्ण जगात इस्लामोफोबियाची दहशत पसरवली जात आहे. त्यामध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. तसेच बायडेन भारत सरकारवर दबाव आणतील, त्यानंतर कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत निर्णय होऊ शकतो. त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधील निवडणुकीसंबंधीदेखील त्यांनी भाष्य केले.
यावर बोलताना ते म्हणाले, काँग्रेससुद्धा पीपल्स अलायन्सचा भाग असून, जिल्हा विकास परिषदेची निवडणूक एकत्र लढणार असल्याचा दावा जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी रविवारी केला होता. जम्मू काश्मीर काँग्रेसचे प्रमुख जी.ए. मीर यांनी काँग्रेस जिल्हा विकास परिषदेची निवडणूक एकत्र येऊन लढेल, असे मला सांगितले असे फारुख अब्दुल्ला म्हणाले होते. त्याचबरोबर अब्दुल्ला यांच्या दाव्याबाबत बोलताना मीर म्हणाले की, राज्यात सगळीकडे निवडणुका होत आहेत. त्यामुळे वेळदेखील कमी असल्याने पक्षाने विचार केला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी स्वबळाचा विचार सुरू असून, काही ठिकाणी आघाडी करून निवडणूक लढवण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.