सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बंजारा समाजाचे नुकसान होत आहे. त्यात बदल करत तांडा तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यासह अन्य मागण्यांचे निवेदन विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनावर विजय राठोड यांच्यासह प्रकाश राठोड, विकास पवार, जैनुदीन पटेल, संजय राठोड, भगवान चव्हाण, सुरेश राठोड, दशरथ पवार, अंकुश राठोड, राजू राठोड आदींच सह्या आहेत. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात तांडा तेथे ग्रामपंचायत स्थापन करावी. वसंतराव नाईक महामंडळावर अध्यक्षांची निवड करावी. व वसंतराव नाईक महामंडळाला निधी द्यावा. बंजारा समाजाच्या पारंपरिक व्यवसाला येणारी अडचणी दूर करावेत. प्रत्येक जिल्ह्यात बंजारा भवन बांधावे. प्रत्येक तांड्यात अंगणवाडी, शाळा व आरोग्यासह रस्ते, पाणी यासह प्राथमिक सुविधा द्याव्यात. जातीच्या दाखल्याचे ६१ वर्षाच्या पुराव्याची अट रद्द करावीत. शासनाच्या वन जमिनी बंजारा समाजाला कसण्यासाठी द्यावेत. गाव तेथे विकास सोसायटी स्थापन करावी. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बंजारा राज्य व केंद्रीय लोकसेवा परिक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करावे आदी मागण्यांचा यात समावेश होता.