बहुजननामा ऑनलाईन टीम – राज्यात सत्ता स्थपनेचा तिढा न सुटल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यात आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ७ वा स्मृतिदिन असल्या कारणाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ ला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीसोबतच्या
या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांना विचारण्यात आलं होतं की, तुम्ही शरद पवारांसोबत आघाडी करणार का? त्यावर बाळासाहेब ठाकरेंनी उत्तर देताना म्हटलं होतं की,’ राजकारण बदमाश लोकांचा खेळ आहे असं म्हटलं असतं तर, तुम्ही बदमाश लोकांसोबत राहणार की सज्जनांसोबत? मी बदमाश लोकांसोबत नाही जाणार, त्यामुळे आघाडी शक्य नाही. तसंच जो माणूस अटल बिहारी वाजपेयी यांच सरकार पाडण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याशी आम्ही कधीच हातमिळवणी करण्याच्या प्रयत्न करू शकत नाही.
बाळासाहेब ठाकरेंनी म्हटले की, ‘जो माणूस सर्वांसमोर सरकार पाडणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते काम केलं,असं म्हणतो. पवार यामध्ये तरबेज आहेत, हे मला माहित आहे, पण मतदारांविषयी विचार केल्यास, ते आमची आघाडी कसे स्वीकारतील.
दरम्यान, बाळासाहेब आणि शरद पवार अनेकदा एकाच मंचावर आले होते. १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसला ७५, शिवसेनेला ६९, राष्ट्रवादीला ५८, तर भाजपला ५६ जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी निवडणुकीनंतर आघाडी स्थापन केली आणि अपक्ष आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले होते.