हिंगोली : बहुजननामा ऑनलाईन – हिंगोली येथील तब्बल 25 राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) जवानांना कोरोनाची लागण झाली असून यामुळे चिंता वाढली आहे. आज सकाळी आलेल्या वैद्यकीय चाचणी अहवालातून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 46 झाली आहे.
हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलातील 194 जवान व अधिकारी मुंबई व मालेगाव येथे बंदोबस्ताची ड्युटी संपवून 19 व 20 एप्रिल रोजी जिल्ह्यात परत आले होते. त्यापैकी 15 जणांना कोरोनाची बाधी झाल्याचे उघड झाल. तर जालना येथील एक जवान गावाकडे परतल्यानंतर केलेल्या तपासणीत तो पॉझिटिव्ह आढळून आला. जालन्याच्या जवानाच्या संपर्कातील इतर दोन व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर वसमत व सेनगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्याची रुग्ण संख्या कालपर्यंत 21 होती, मात्र त्यामध्ये आज 25 जणांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46 झाली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात आज प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार 25 एसआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. एका रुग्णाने कोरोनावर मात केली असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. मालेगावहून आलेल्या 33 तर मुंबईहून आलेल्या 8 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर यथील खासगी ट्रॅव्हल्सवरील चालक 23 एप्रिल रोजी पंजाब येथील भाविकांना सोडण्यासाठी गेला होता. तो परत आल्यावर त्याची चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
एनपीन्यूज24 नेटवर्क