नवी दिल्ली वृत्तसंस्था – केंद्रात तुम्हाला सनदी अधिकारी व्हायचं असेल तर UPSC परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.आता मात्र केंद्र सरकारने एक निर्णय घेतलाय त्यानुसार तुम्हाला UPSC परीक्षा न देता देखील केंद्रात अधिकारी होता येणार आहे.
अनेक लोकांकडे बुद्धी आणि काम करण्याची सचोटी असते. पण, UPSC परीक्षा पास न झाल्यानं सरकारी अधिकारी होता येत नाही. परंतु आता यापुढे तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या अनुभवाच्या जोरावर आता थेट केंद्रात सरकारी अधिकारी होता येणार आहे.याबाबत नीती आयोगाचे सल्लागार अलोक कुमार यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. याबाबतची जाहिरात लवकरच काढली जाणार आहे.
सध्या नीती आयोगाने ४४ जागांकरता अर्ज मागवले आहेत. या अर्जांची छाननी केल्यानंतर अर्जदाराच्या योग्यतेनुसार त्याची नेमणूक केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून केली जाणारी ही नियुक्ती कंत्राट तत्वावर असणार आहे. साधारणपणे १ लाख ५० हजार मानधन व्यक्तीला निवड झाल्यानंतर मिळणार आहे.
काय आहे पात्रता ?
यासंदर्भात नीती आयोगाचे सल्लागार अलोक कुमार यांनी ट्विट केले आहे त्यात म्हंटले आहे कि , संबधित उमेदवाराची निवड करताना त्याचा अनुभव पाहिला जाणार आहे. शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं जाणार नाही. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय हे २६ ते ३५ वर्षे असणं गरजेचं आहे. विविध विभागांमध्ये काम करण्यासाठी ही निवड केली जाणार आहे. नीती आयोगाच्या वेबसाईटवरून याबद्दलची अधिक माहिती मिळू शकणार आहे.
https://twitter.com/IasAlok/status/1147059544134000640