बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार इरफान खान आज आपल्यात नाही. सिनेमाच्या माध्यमातून तो कायमच चाहत्यांच्या मनात राहिल. त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाचं स्टेटमेंट समोर आलं आहे. इरफान खानची पत्नी सुतापा आणि मुलं बाबिल व आयान यांचं हे स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट आता इरफानच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलं आहे.
इरफानच्या ट्विटरवरून ही पोस्ट शेअर झाल्यानंतर आताच चाहतेही भावूक झाले आहेत. सतत यावर कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांना कुटुंबियांसाठी सहानुभूती व्यक्त केली आहे. एका चाहत्यानं लिहिलं की, इरफान मरत नाहीत. ते जिवंत राहतात. कथांमध्ये. या जमान्यानंतर आणखीही खूप जमान्यांमध्ये.
एका चाहत्यानं लिहिलं की, इरफान खानच्या शानदार अॅक्टींगला हा देश कधीच विसरू शकत नाही. एक शानदार कलाकारासोबतच ते एक सज्जन माणूस होते आणि मातीशी जोडलेले होते.
इरफान खानची पत्नी सुतापानं शेअर केलल्या या स्टेटमेंटध्ये म्हटलं आहे की, “मी कसं स्वत:ला एकटं मानू जेव्हा पूर्ण दुनिया माझ्या सोबत आहे. कोट्यावधी लोक दु:ख व्यक्त करत आहेत. मला सर्वांना सांगायचं आहे की, हे नुकसानं नाही तर हे मिळवणं आहे. गोष्टी मिळवणं आहे ज्या आपल्याला शिकवल्या गेल्या आहेत. आता याच गोष्टींवर अमल करण्याची वेळ आहे.”
सुतापा यांनी लहिलं की, “जेव्हा मी माझ्या मुलांना त्यांच्या वडिलांकडून दिलेली शिकवण सांगायला सांगितली तेव्हा बाबिल म्हणाला, अनिश्चिततेच्या नृत्यापुढे नतमस्तक होणं शिका आणि ब्रम्हांडावर भरोसा ठेवा. आयन म्हणाला, आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवायला शिकून घ्या. याला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका.”
एनपी न्यूज 24 नेटवर्क