बहूजननामा ऑनलाइन – बॉलिवूडचे दिग्गज स्टार ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत. दि 30 एप्रिल रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ऋषी कपूर यांच्या रोमँससोबतची एक रोचक कहाणी इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी त्यांचं पुस्तक इंडिया आफ्टर गांधीमध्ये लिहली आहे. या ऋषी यांचा पहिला आणि रोमँटीक सिनेमा बॉबी आण माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल कहाणी सांगण्यात आली आहे. जी सद्य स्थितीत प्रासंगिक वाटत आहे.
ज्या प्रमाणे सध्या सरकार लोकांना घरात राहण्यासाठी सांगत आहेत आणि त्यांच्यासाठी रामायण आणि महाभारत रिपीट टेलीकास्ट करत आहेत तसंच माजी पीएम इंदिरा गांधी यांनी अगदी चकित करणाऱ्या पद्धतीनं तेव्हा बॉबी सिनेमा दूरदर्शनवर प्रसारीत केला होता. त्यांना एका प्रतिस्पर्धी नेत्याच्या रॅलीला जाण्यापासून लोकांना रोखायचं होतं.
यावरूनच बॉबी सिनेमाच्या प्रभावाचा अंदाज येऊ शकतो. आणीबाणीनंतर जेव्हा इंदिरा गांधी यांनी लोकसभा निवडणुीकीची घोषणा केली तेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडत बाबूजी म्हणजे जगजीवन राम यांनी आपली पार्टी बनवली होती आणि ते जनता पक्षाला मिळाले होते. तेव्हा त्यांना एक मजबूत नेता मानलं जात होतं. ते प्रमुख दलित चेहरा होते. काही लोक तर त्यांना भविष्यातील पीएम म्हणून पहात होते.
रामचंद्र गुहा यांनी उल्लेख केल्यानुसार, 6 मार्च रोजी दिल्लीत एक विशाल सभा होणार होती. या सभेपासून जनतेला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं सभेच्या वेळेवर ऋषी कपूर यांनी प्रसिद्ध रोमँटीक सिनेमा बॉबी दूरदर्शनवर प्रसारीत केला होता. तेव्हा दूरदर्शन हा एकमेव चॅनल होता जो सरकारच्या मनानुसार चालत असे. असं म्हणतात, जर इतर दिवशी बॉबी सिनेमा लागला तर दिल्लीतील जवळपास अर्धी लोकसंख्या घरीच असती. परंतु बाबूजी यांच्या सभेसाठी मात्र लोकांनी सिनेमाचा त्याग केला. तेव्हाच्या वर्तमानपत्रात अशी हेडलाईन होती की, आज बाबूजी यांनी बॉबीवर विजय मिळवला. काँग्रेस आपल्या मनसुब्यात यशस्वी होऊ शकली नाही.
एनपी न्यूज 24 नेटवर्क