नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी तसेच आघाडीसोबत येण्याचा विचार करावा. आघाडीसाठी आमचे दरवाजे कधीही खुले असून चर्चा करायला आम्ही आजही तयार आहोत, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. सोमवारी नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
देशभरात भाजप सध्या फोडाफोडीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने देशाच्या लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम केलय.कर्नाटकमध्ये जे सुरू आहे ते योग्य नाही.लोकशाहीला काळिमा फासणारी ही गोष्ट आहे.पण हे असे जास्त काळ चालणार नाही. राजकारणात हार-जीत होतच राहते. आता सर्व कॉंग्रेसजणांनी एकत्र राहीले पाहीजे.
दरम्यान, लोकसभा पराभवाची नैतिक जबाबदारी घेत काँग्रेस नेते पदांचा राजीनामा देत आहेत. मी या आधीच राजीनामा दिला होता. व्यक्तीपेक्षा पक्षाला व विचारधारेला जास्त महत्त्व असते. अजूनही मी आणि माझे सर्व कार्यकर्ते काम करतोच आहे. केंद्रीय अध्यक्ष जी जबाबदारी देतील, ती पार पाडणार आहोत, असे चव्हाण म्हणाले.