लखनौ : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना. आता उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार सपा ३७ आणि बसपा ३८ जागांवर निवडणुका लढणार आहे. ५ जागा या मित्रपक्षांसाठी देणार आहेत.
१७ व्या लोकसभेसाठी सपा आणि बसपा युतीची घोषणा केल्यानंतर अमेठी आणि रायबरेली येथे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. परस्परांचे विरोधी राहिलेले हे पक्ष युती करून भाजपला रोखण्यात किती प्रमाणात यशश्वी होतील हे येणारा काळ सांगेल. समाजवादी पक्षाकडून कैराना, मोरादाबाद, संभल, रामपूर, मेनपुरी, फिरोजाबाद, बरेली, लखनौ, इटावा, कानपूर, झांसी, बांदा, इलाहाबाद, वाराणसी आणि मिर्जापूरसह 37 मतदार संघातून उमेदवार देणार आहे. तर बहुजन समाज पक्षाकडून सहारंगपूर, अलिगड, आग्रा, सितापूर, सुलतानपुर आदी ठिकाणी उमेदवार उभे करणार आहेत.
सपा-बसपाच्या युतीवर मुलायम सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्याच पक्षाचे लोक पक्षाला संपवत असल्याचे म्हटले आहे. तिकीट देण्यास उशिर झाला असून पक्षातील माझं काम काय तेच कळत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच भाजप खूपच पुढे असल्याचे देखील मुलायम सिंह यादव यांनी म्हटले आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने उत्तर प्रदेशमध्ये ७० जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र भाजपाला कॉंग्रेस आणि सपा- बसपाचं थेट आव्हान असणार आहे. २०१४ प्रमाणे ७० जागा जिंकता येतील का ? ही देखील भाजपला शंका आहे. त्यामुळे भाजपने आता इतर राज्यांमध्ये देखील आपले लक्ष केंद्रीत केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये होणारे नुकसान भाजप महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधून भरून काढण्यावर भर देईल काय येणार काळ वेळ सांगेल.