लखनौ : बहुजननामा ऑनलाईन – भाजप सरकर सतेमध्ये आल्यापासून मोदी सरकार आपण स्वतः लष्कर असल्यासारखे वागत आहे. सरकारणे अशा थाटात वागता कामा नये व सैनिकाच्या शौर्याचा त्यांनी राजकीय वापर करू नये.असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मोदी सरकारला खडसावले आहे. पुलवामा हल्ला प्रकरणात मोदींनी विरोधकांना लक्ष केल्यानंतर अखिलेश यादव यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे.
प्रसार माध्यामाध्ये बोलताना अखिलेश यादव म्हणाले कि लष्कराच्या जवानांनी जी प्राणाची आहुती दिली आहे. त्याविषयी कोणीही शंका उपस्थित करणे योग्य नाही हे खरे आहे. पण आपणच लष्कर आहोत अशा थाटात वागणे हे सैनिकाच्या शौर्याचा अपमान आहे. भाजपने त्याचा राजकीय वापर करू नये. सरकारच्या कोणत्याही कृत्याविषयी जाब विचारण्याचा विरोधकांना अधिकार आहे. पण विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. ही सरकारची भूमिका संविधान विरोधी आहे आणि देशाच्या अधिक घातक असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.