पिंपरी चिंचवड : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन मतदार संघातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांना आणि त्यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलंच दम दिला आहे. ‘आता घोषणाबाजी कराल तर, तिकिटचं देणार नाही, ‘ अश्या शब्दात त्यांनी दम देत अजित पवारांनी उतावळ्या कार्यकर्त्यांना शांत केले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर मेळाव्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला. मेळाव्या वेळी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपलं शक्ती प्रदर्शन करण्यास सुरुवात केली, इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच उमेदवाराला निवडणुकीचं तिकीट मिळावं म्हणून मोठमोठ्याने घोषणाबाजी सुरु केली. त्यावेळी संतापून अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शांत बसण्यासाठी अजित पवारांनी हा सज्जड दम दिला.
यावेळी मेळाव्यात अजित पवार म्हणाले कि, ‘ आघाडीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही मतदार संघ आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात लवकरच उमेदवार जाहीर करण्यात येतील त्यामुळे कोणीही नाराज व्हायचं कारण नाही, येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून द्या, सहा महिन्यात शास्ती कर (अनधिकृत बांधकामावर आकारला जाणारा कर ) माफ केला नाही तर पवारांची औलाद नाही सांगणार.’
तसेच समोर बसलेला हरेक कार्यकर्ता आमच्यासोबत आहे , त्यामुळे आम्ही कोणाच्या बापाला घबरात नाही, मध्यंतरी कामाच्या गडबडीत मी पिंपरी चिंचवडला येऊ शकलो नाही तर, लगेच चर्चा होऊ लागल्या कि, अजित पवार आपल्या शहरवासीयांना विसरले , त्यांना मी सांगेल कि, मी कधीही विसरलो नाही आणि कधी विसरणार पण नाही, मी कधीही येऊ शकतो , मी कधी यायचं कधी नाही ते कोणी सांगू नये, त्यामुळे माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांमध्ये कोणीही ढवळाढवळ करू नये, अश्या कड्या शब्दात अजित पवारांनी सुनावले आहे.
ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे, परंतु आघाडीचे सरकार आल्यानंतर परत आम्हाला घ्या, असं आजिबात म्हणू नका, मी तर गेलेल्या कुणालाच पक्षात परत घेणार नाही, त्यामुळे कोणीही म्हणू नये. घ्या साहेब पदरात, अरे इथं पदरात घेता घेता पदर फाटला आमचा, ‘ अश्या शब्दात अजित पवार यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान अजित पवार यांनी भाजप -शिवसेना युतीवरदेखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले आहे कि, शिवसेना बॅकफूटवर खेळत आहे. कितीही ताणले तरी युती कायम राहणार . बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेसची शिवसेना राहिलेली नाही. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे कमळीचा वापर करायचे, पण आता चित्र पालटले आहे. तसेच यावेळी अजित यांनी वंचितमुळे आपल्याला फटका बसल्याची कबुली दिली आहे. वंचित आघाडी नसती तर आपले १२-१३ खासदार खासदार आले असते, ‘ अशी कबुलीही त्यांनी दिली.
Visit : bahujannama.com