वर्धा : बहुजननामा ऑनलाइन – सध्याच्या राजकीय परिस्थितीत फुले, शाहू, आंबेडकर विचारकांची विविध पक्षात होत असलेली घुसमट लक्षात घेता विचार मंथन करण्यासाठी शांताई सभागृहात सभागृहात नुकतीच बैठक पार पडली. यावेळी विविध सामाजिक कार्यकर्त्यांसह भाजपा, काँग्रेस व बसपामधील कार्यकर्त्यांची हजेरी होती.
भाजपाचा कट्टरतावाद व काँग्रेस प्रेक्षकांच्या भूमिकेत असून फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा मवाळ केली की, दगडापेक्षा विट मऊ असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झाले. त्यामुळे बसपा हीकारक राहणार असा विचार प्रवाह उमटला. दिशाहीन करणाऱ्या पक्षांबाबत यावेळी चर्चा होऊन पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचे मत अनेकांनी मांडले.
यावेळी माजी. पं.स. सदस्य देवानंद डोळस, सुनील डोंगरे, मोहन राईकवार, आशीष सोनटक्के, ॲड. कपीलवृक्ष गोडघाटे, प्रमोद पानबुडे, कृष्णा हरले, यादव मडावी, रुपचंद टोपले, विनोद पाटील, तागडे, बोबडे, संजय देसाई, अवधुत शेंद्रे, महेंद्र डोंगरे, नारायण सोनटक्के, निरंजन वानखडे, सुनील कळसकर, कपील शेंडे, अनिल गायकवाड, मधूकर सोमकुंवर, संतोष तागडे, जानराव पखाले, प्रकाश दंडाळे, संतोष मोखडे, प्रेम गाडगे, देवानंद पटले,अमोल झटाले, संजय डोळस, अनिल पाटील व आर्वी, आष्टी, कारंजा येथील कार्यकर्ते उपस्थित होते.