मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर अयोध्येला जाण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुस्लिमांना घाबरवत आहेत, असे म्हणाले आहेत. जर उद्धव ठाकरे अयोध्येत राम मंदिर बांधणार असतील तर आम्हीसुद्धा अयोध्येला जाणार. पण तिथे आम्ही बाबरी मशीद बांधणार, असे वक्तव्य फरहान आझमी यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात २७ जानेवारीला मुंबईत झालेल्या मोर्चाचा संदर्भ देत फरहान यांनी विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे अयोध्येला जात असतील तर मीसुद्धा जाईल. आम्ही सर्व जण जाऊ. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही आमंत्रित करेल. माझे वडीलही जातील. उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्यासाठी जातील. पण आम्ही बाबरी मशीद बांधायला जाऊ. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्ही निराश झालो आहोत.
Farhan Azmi, son of Samajwadi Party (SP) Maharashtra leader Abu Azmi: If being the Chief Minister, Uddhav Thackeray says he is going to Ayodhya on 7th March, I will also go with him. He will build lord Ram's Temple & we will build Babri Masjid. (27.01.20) pic.twitter.com/InTAJ37cOy
— ANI (@ANI) January 30, 2020
तसेच महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाण्याचा निर्णय मुस्लिमांना घाबरवण्यासाठी घेतला आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, जगभरात २.५ अरब लोकसंख्या आहे. त्यात ५० पेक्षा जास्त मुस्लिम देश आहेत जे आम्हाला हसत-खेळत आमच्या देशात आम्हाला परत घेऊन जातील. पण आम्ही जाणार नाही, असेही फरहान आझमी म्हणाले.
Visit : bahujannama.com