मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु असून गुरुवारी महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यासंदर्भात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याला याबद्दल काही माहित नसल्याची प्रतिक्रिया दिली. यावरुन मविआत मतभेत असल्याची चर्चा सुरु झाली. यावर बोलताना ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. मविआमध्ये मतभेद नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच अजित पवार यांची प्रस्तावावरील सही हा तांत्रिक मुद्दा असल्याचे संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नार्वेकर विरोधकांना बोलू देत नाहीत
यावेळी संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील निशाणा साधला. राहुल नार्वेकर विरोधक आमदारांना बोलू देत नाहीत. विधानसभा अध्यक्षांनी असं पक्षपाती वागणं चुकीचं आहे. सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्याक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
सीमावर्ती भागात मराठी भाषिकांवर अन्याय
यावेळी संजय राऊत यांनी सीमावादावर (Maharashtra-Karnataka Border Dispute) देखील प्रतिक्रिया दिली. बेळगाव आणि कर्नाटकच्या इतर सीमावर्ती भागात मराठी भाषिकांवर अन्याय सुरु आहे. त्यामुळे हा प्रदेश केंद्रशासित करावा अशी आमची मागणी आहे. मुंबईमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक राहतात. सर्व आनंदाने राहत आहेत, मुंबईमध्ये अत्याचार होतो अशी कोणत्याही कन्नड भाषिक व्यक्तीची तक्रार नाही. त्यामुळे मुंबई केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी करणं मुर्खपणाचं असल्याचे राऊत यांनी म्हटलं.
Web Title :- MP Sanjay Raut | thackeray group leader sanjay rauts reaction on the disagreement in mahavikas aghadi
हे देखील वाचा :
Pune Crime News | शेतजमिनीवरुन नंणदेकडून भावजयीच्या खूनाचा प्रयत्न, लोणी काळभोर परिसरातील घटना